27/07/2023
देशातील सर्व वहान चालकांनी एकत्र येऊन न्यायं हक्काच्या संघर्षा साठी संघटीत व्हावे ;- बाबा कांबळे
राज्यस्थान :-
देशातील लगबघ पचंवीस करोड रिक्षा, टॅक्सी ट्रक ,बस चालक आहेत. त्याच बरोबर वहान वहातूक व्यवसायिक सर्वांचे कोविड महामारीच्या काळात व नंतर चालक मालकांची दैनावस्था झाले आहे. , देशातील पंचवीस करोड च्या अधिक चालक मालक आणि वहान वहातूक व्यवसायिक अंधकाराच्या खाईत दडपले गेलें आहेत. अशा गंभीर परिस्थिती शी सामाना व समस्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित संघटीत होऊन सरकार च्या चुकीच्या पक्षपाती धोरणा विरुद्ध आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करने आवश्यक आहे. त्या साठी देशातील सर्व वाहन चालक मालका के सारे ड्रायव्हर चालक मालक आणि वहान वहातूक व्यवसायिकांनी संघर्षा साठी संघटीत व्हावे. असे आवाहन रिक्षा टॅक्सी, बस वहातूक फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
श्री गंगानगर राजस्थान मधील कुमार धर्मशाळा सभागृहात चालकांचे राष्ट्रीय अधिवेशन संमेलन संपन्न झाले. संमेलनात उपस्थितीत वहान चालक, मालकांना चालक व वहान वहातूक व्यवसायिक यांना मार्गदर्शन करतांना नेते बाबा कांबळे यांनी देशातील सर्व वाहन चालक, मालकांना आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
राजस्थान कार्यक्रमा चे मुख्य संयोजक आणि फेडरेशन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष के.डी.गिल यांच्या अध्यक्षा ते खाली राष्ट्रीय चालक-मालक महाधिवेशन संमेलन संपन्न झाला.
या कार्यक्रमात श्री गंगानगर के जने माने नेता शहराचे महापौर अशोक चांडाळ,सामाजीक नेते भोजराज जैन, युवा नेता राघव चांडक, मिर मोहम्मद सफी अध्यक्ष (कश्मीर) के. डी. गिल, (राजस्थान )अर. के. शर्मा (दिल्ली) विनय बुद्धभूषण (तेलंगणा) नरेंद्र ठाकूर ( हिमाचल प्रदेश) पद्मनराज (तामिळनाडू ) मनोज कुमार शाहू (ओडिसा ) प्रकाश कुमार सिंग ( बिहार ) रवी राठोड ,सुमर अंबावत (दिल्ली) सुरेंद्र प्रसाद ( पंजाब) रवी रेड्डी (कर्नाटक) अन्वर भाषा (आंध्र प्रदेश) राकेश शिंदे, ( मुंबई महाराष्ट्र ) एकनाथ ढोले, हितेंद्र सोमानी, ( पुणे महाराष्ट्र ) बल्लूर स्वामी ( इचलकरंजी महाराष्ट्र ) आदी देशभरातील सर्व राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
या अधिवेशनात
देशातील सर्व वाहन चालक मालकां साठी राष्ट्रीय वेल्फर बोर्ड स्थापना करून त्यात सामाजिक सुरक्षा, आरोग्य , मुलांचे शिक्षण सुविधा मिळावे आणि वृद्धाप काळात सानुग्रह अनुदान ची सुविधा मिळावे , ट्रान्सपोर्ट वहान वहातूक व्यवसायाला उद्योगा चा का दर्जा मिळावा , राष्ट्रीय चालक आयोग ची स्थापना करावी, देशभरात सरकार च्या वतीने वाहन चालकां साठी दिल्ली त राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे या मागण्या सह आणि ईतर मागण्यांचे ठराव संमत केले गेले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाषस्वामी,सुरजित सिंग पराड,अवतार सिंग,
प्रवीण यादव, दिनेश कुमार, कश्मीर सिंग, पुष्पेंदर सोनी, आदित्य गिल, बलदेव स्वामी, रोहित तहेर,
या सहकार्यांची परिश्रम घेतले.